कोरेगाव भिमा हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारताचे एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्ट्या, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात व शिरूर तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाते. कोरेगाव भिमाजवळ भीमा नदीवर ब्रिटीशकालीन ऐतिहासिक सरसेनापती हंबीरराव मोहिते पूल असून पूर्वी हा पूल पुणे व विदर्भाला जोडण्याचे महत्त्वाचे काम करत होता.
सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झाला असून भीमा नदी पुढे कृष्णा नदीस मिळते.
भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमाशंकर येथे १०० मी. उंचीवर उगम पावल्यावर ती वाहतवाहत सपाट प्रदेशात येते. उगम पावल्यापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरापर्यंत भीमा अरुंद पात्रातून वाहते. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र तुळापूरजवळ इंद्रायणी नदी भीमेस मिळते इथे प्राचीन संगमेश्वर मंदिर आहे. व पुढे याच भीमा नदीच्या काठावर कोरेगाव भीमा हे गाव वसले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाने पवित्र झालेली भूमी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक हे गाव कोरेगावपासून २ किमी वरती आहे.
															
															
								कोरेगाव भिमा जवळ सन १८१८ च्या पेशवे व ब्रिटीश यांच्या झालेल्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या ४९ सैनिकांचीनावे कोरली. यामध्ये २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे आहेत. या स्तंभावर लिहिले आहे -‘One of the Triumphs of the British Army of the Earth’. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927 रोजी पहिल्यांदा विजयस्तंभाला स्वतः उपस्थित राहून अभिवादन केले होते.
								माळवा प्रांताच्या राज्यकर्त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा काळ हा कला आणि संस्कृतीच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या कारकिर्दीत स्थापत्यकलेने विशेष योगदान दिले आहे. अहिल्याबाई यांनी अनेक धार्मिक स्थळांचे निर्माण केले. या स्थळांमध्ये मंदिरं, घाट आणि धर्मशाळा यांचा समावेश आहे, कोरेगाव भीमा येथील भीमा नदीच्या काठावरती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केलेले अहिल्येश्वराचे प्राचीन शिवालय गावाचे सौंदर्य आणखी खुलवत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे काही काळ कोरेगाव भीमा गावात वास्तव्यही होते व त्यांचा भव्यदिव्य वाडाही उभारण्यात आला. आता या वाड्याची पडझड झाली आहे.
								कोरेगाव भीमा गावात प्राचीन कोरेश्वराचे शिवालय असून, याच कोरेश्वर शिवालयामुळे गावाला कोरेगाव हे नाव पडले असे मानले जाते.
								स्वातंत्र्य संग्रामात कोरेगाव भिमातील भांडवलकर कुटूंबीयांचे फार मोठे योगदान आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजीनी भारतभर उभारलेला १९४२ च्या चलेजाव चळवळीत मोठ्या नेटाने सहभागी असणारे व स्वतः येरवडा कारागृहात जेल भोगलेले थोर स्वातंत्र्यसेनानी देशभक्त स्व. श्री. मारूती भिमाजी भांडवलकर येवढ्या मोठ्या चळवळीत आपल्या गावातील एक तरूण देशभक्तीच्या ओढीने स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊन प्रसंगी कारावास भोगुन देशासाठी बलिदानाची आहुती देतो. ही कोरेगाव भिमाची माती निश्चितच पवित्र असेल. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणुन तत्कालीन पंतप्रधान मा. इंदिराजी गांधी यांनी स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्षानिमित्त १५ ऑगस्ट १९७२ रोजी त्यांचा भारत सरकारच्या वतीने ताम्रपत्र देऊन गौरव केला होता
															
															शहराची परंपरा, महानता आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवा
7300220023
grampanchayatkoregaonbhima@gmail.com
नवीनतम ग्रामपंचायत कोरेगाव भिमा बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.





